🕒 1 min read
मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. ३ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही आस्थापना सुरु राहणार नाही. रेल्वेनेही ३ मे पर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे अनेक ठिकाणी मजुरांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. त्यात मंगळवारी वांद्रे येथे झालेल्या गर्दीमुळे प्रशासनावर ताण आला आहे.
त्यात खोट्या बातमीमुळे नागरिकांचा गैरसमज होऊन ही गर्दी झाली असल्याच बोललं जात आहे. त्यामुळे ABP माझाचे पत्रकार राहुल कुलकर्णी यांना पोलिसांनी अटक केली आहे. राहुल कुलकर्णी यांच्या अटकेनंतर राज्यातील पत्रकारांनी एकत्र येत राहुल कुलकर्णी यांना पाठींबा दर्शवला आहे. तर सबंधित वाहिनीने त्या वृत्ता मागची आपली भूमिका मांडली आहे.
वांद्र्यातले माझे मुस्लिम बांधव, उत्तर भारतीय, आणि मद्रासी लोक “एबीपी माझा” मराठी वृत्तवाहिनी बघतात?#आलं #अंगावर #ढकला #पत्रकारांवर
— Vaibhav Parab – वैभव परब (@vaibhavparab21) April 15, 2020
जेव्हा पत्रकारिता निर्भिडपणे केली जाते तेव्हा साथ ही मिळतेच #Isupportrahulkulkarni #fearlessjournalism @RahulAsks https://t.co/w69Z17wUvb
— Anuja Dhakras (@AnujaDhakras21) April 16, 2020
अत्यंत संयत, स्पष्ट आणि सत्य पत्रकारिता करणाऱ्या माझ्या सहकाऱ्यावर केवळ राजकारणापोटी अन्याय होतोय, हे खेदजनक आहे. ती गर्दी राहुलच्या बातमीमुळे झाली असं ज्यांना वाटतं, त्यांना कोपरापासून नमस्कार! बाकी मी 13 वर्षांपासून राहुलसोबत होतो, आहे, राहीन @RahulAsks#Isupportrahulkulkarni pic.twitter.com/zpN20WhFFX
— rahul khichadi (@rahulkhichadi) April 15, 2020
हे बघा… आणि काही लिंक लागते का बघा!
टीप: वाधवान अजूनही महाबळेश्वरची थंड हवा खातोय, आणि त्याचा पर्दाफाश करणारा पत्रकार जेलची!
वाह रे वाह सरकार! टाळ्या वाजवा रे!#Isupportrahulkulkarni@RahulAskshttps://t.co/odoushRlm9— rahul khichadi (@rahulkhichadi) April 16, 2020
प्रश्न विचारणं हा एका पत्रकाराचा मूलभूत अधिकार आहे…आता या सगळ्या प्रकारानंतर त्या अधिकारावरच भलंमोठ्ठ प्रश्नचिन्ह उभं राहताना दिसतंय..#Isupportrahulkulkarni @RahulAsks @CMOMaharashtra @rahulkhichadi @abpmajhatv @vijaysalvi9 pic.twitter.com/ytlOkMa95N
— Pradnya Powale (@PradnyaPowale) April 16, 2020
मंत्री महोदयांना माहित नसेल की, @RahulAsks ने दिलेल्या बातमीत कुठेही चुक नाही, त्यानं ज्या संदर्भानं बातमी दिली ते रेल्वेचं लेटरही खरं आहे. सरकारचं अपयश झाकण्यासाठी तुम्ही एका चांगल्या पत्रकाराचा बळी देताय. @PawarSpeaks @OfficeofUT https://t.co/rIWxvJtLKn
— Manik Balaji Mundhe (@Manikmundhe) April 15, 2020
पत्रकार राहुल कुलकर्णी की गिरफ़्तारी ग़लत है
पुलिस अब तक कोई संबंध स्थापित नहीं कर पायी है कि ख़बर से बान्द्रा में भीड़ इकट्ठा हुई.
पुलिस पहले राहुल से पूछताछ कर सकती थी, पुलिस को रेलवे से भी चिट्ठी के बारे में पूछना चाहिए था.
गिरफ़्तारी में जल्दबाज़ी समझ से परे
— Milind Khandekar (@milindkhandekar) April 16, 2020
तसेच पत्रकारांनी देखील एकत्र येत राहुल कुलकर्णी यांना पाठींबा दिला आहे. लोकसत्ता, सामना या दैनिकांनीही आपला पाठींबा दर्शवला आहे. राहुल कुलकर्णी यांना आज न्यायालयात दाखल करणार आहेत.
काय होती बातमी ?
मध्यंतरी 12 एप्रिलला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. त्यावेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांना विनंती केली होती, की, जर मध्ये 24 तासांचा कालावधी दिला तर अनेक अडकलेल्या मजुरांना आपापल्या घरी जाता येईल. त्या पार्श्वभूमीवर एबीपी माझाने एक बातमी दिली होती. रेल्वेच्या साऊथ सेंट्रल झोनमध्ये मराठवाड्यातील अनेक जिल्हे येतात. या जिल्ह्यांमध्येही अनेक मजूर अशाच प्रकारे अडकले आहेत. या सर्वांना घरी जाण्यासाठी रेल्वे एक जनसाधारण स्पेशल ट्रेनची व्यवस्था करत आहे. या संदर्भात 13 एप्रिलला साऊथ सेंट्रल झोनच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे एक बैठक झाली होती. यामध्ये अशा ट्रेन चालवण्यासंबंधीचा प्रस्ताव तयार करण्यात आला होता. या प्रस्तावाच्या आधारावर ही बातमी होती.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

