Share

आता बस्स झालं उद्याच्या-उद्या निर्णय घ्या, इथे लेकरांच्या जेवणात चिखल पडलाय…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई : ऊसतोड कामगारांसाठी भाजप नेत्या आणि माजी मंत्री पंकजा मुंडे या कमालीच्या आक्रमक झाल्या आहेत. पावसात कामगारांचे हाल होत आहेत. उद्याच्या उद्या त्यांची घरी जाण्याची सोय करा, असं आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं आहे.

‘कोरोना’च्या संकट काळातच कोल्हापूरसह काही जिल्ह्यांना पावसाचाही फटका बसला. लॉकडाऊनमुळे अनेक मजूर परजिल्ह्यात अडकले आहेत. अशातच पावसामुळे अनेकांची गैरसोय झाली आहे. त्यामुळे पंकजा मुंडे यांनी उद्याच्या उद्या या मजुरांच्या घरी जाण्याची सोय करा, असं आवाहन ट्विटरवरुन केलं आहे.

‘इथे लेकरांच्या जेवणात चिखल, कुडं पडली, धान्य भिजलय, आज अन्न गेलं नाही गळ्याखाली! बिचारे मजूर आयसोलेशनने आजारी पडतील. सर्व शिस्त पाळून, कष्ट करुन त्यांच्या ताटात माती? ते हॉट स्पॉटमध्ये नाहीत, न हॉट स्पॉटला जाणार आहेत. मग काय प्रॉब्लेम? उद्याच्या उद्या जाहीर करा निर्णय बस्स!!’ अशी मागणी पंकजा मुंडे यांनी केली आहे.

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!