🕒 1 min read
नवी दिल्ली : पुलवामा हल्ल्यानंतर देशभरात संतापाची लाट उसळली आहे. जनता फक्त पाकिस्तानकडून बदला घ्या अशी मागणी करत आहे. जनतेची हीच भावना ओळखून भारताचा माजी सलामीवीर गौतम गंभीरने देखील आपलं मत व्यक्त केलं आहे. आता पाकिस्तानशी चर्चा होऊ शकत नाही, आता युद्ध करायलाच हवे, अशी रोकठोक भुमिका गंभीरने मांडली आहे.
गंभीरने एक ट्विट केले असून त्यामध्ये आपले मत व्यक्त केले आहे.
“यापूर्वी पाकिस्तानशी चर्चा होत होती. पण चर्चा करण्याची ही वेळ नक्कीच नाही. आता चर्चा करण्यापेक्षा काही तरी करण्याची वेळ आली आहे. आता चर्चा टेबलवर नाही तर आता भेट थेट युद्धाच्या रणांगणात व्हायला हवी.”
Indian Army ने यह जंग भी शुरू नहीं करी but they will bloody well finish it and I am with them emotion-to-emotion, shoulder-to-shoulder.
— Gautam Gambhir (@GautamGambhir) February 17, 2019
दरम्यान,पुलवामातील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतात संतापाची लाट उसळली आहे. भारतीय सैन्याने पाकिस्तानमध्ये घुसून सर्जिकल स्ट्राईक करावे अशी मागणी जोर धरू लागली आहे. भारत केव्हाही सर्जिकल स्ट्राइक करू शकतो या भीतीने पाकिस्तानने नियंत्रण रेषेवरील दहशतवाद्यांचे तळ हलवण्यास सुरुवात केली आहे. आमच्या Let’s Talk या आमच्या विशेष कार्यक्रमात याच मुद्द्याबाबत आम्ही पुण्यातील तरुणाई बरोबर संवाद साधला. पाकिस्तानला त्याच्याच भाषेत धडा शिकविण्याची मागणी यावेळी संतप्त तरुणांनी केली आहे.
पहा व्हिडीओ –
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

