🕒 1 min read
मुंबई : कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशात ३ मे पर्यंत लॉकडाऊन वाढवण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतला आहे. ३ मे पर्यंत अत्यावश्यक सेवा वगळता इतर कोणतेही आस्थापना सुरु राहणार नाही. रेल्वेनेही ३ मे पर्यंत प्रवासी वाहतूक बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र या निर्णयामुळे अनेक ठिकाणी मजुरांचा आक्रोश पाहायला मिळत आहे. त्यात मंगळवारी वांद्रे येथे झालेल्या गर्दीमुळे प्रशासनावर ताण आला होता.
आता याच वरून भाजपचे नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी ठाकरे सरकारवर घणाघाती टीका केली आहे. तसेच त्यांनी ही टीका वैयक्तिक मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर देखील केली आहे. आपल्या ट्वीटरवर निलेश म्हणाले,
‘सरकार चालवता येत नाही पण आता छोट्या छत्रीने सोशल मीडिया टीमला परिस्थिती काही करून सुधारा असे आदेश दिल्याचं समजलंय. त्याला सांगा मुंबईची चार गटारं साफ केली म्हणजे सरकार चालवणं नाही. मुंबईत राहून जो कोरोनाच्या भीतीने स्वतःच्या मतदारसंघात गेला नाही तो जीवनात काही करू शकत नाही.
सरकार चालवता येत नाही पण आता छोट्या छत्रीने सोशल मीडिया टीमला परिस्थिती काही करून सुधारा असे आदेश दिल्याचं समजलंय. त्याला सांगा मुंबईची चार गटारं साफ केली म्हणजे सरकार चालवणं नाही. मुंबईत राहून जो कोरोनाच्या भीतीने स्वतःच्या मतदारसंघात गेला नाही तो जीवनात काही करू शकत नाही.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 15, 2020
हेही पहा –
https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

