मुंबई : लोकसभा निवडणुकीत मोठा विजय मिळविल्याने भाजप आणि मित्रपक्षांचा आत्मविश्वास द्विगुणित झाला आहे. या पराभवानंतर शिवसेनेने काँग्रेसच्या पराभवाचं कारण सांगत काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्यावर हल्लाबोल केला आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून राहुल गांधी आणि काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. यासोबतच उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं कौतुक केलं आहे.
नेमकं काय म्हटलय आजच्या अग्रलेखात ?
मणिशंकर अय्यर छाप पुढाऱ्यांना घेऊन काँग्रेस पक्ष चालवण्यापेक्षा बरखास्त केलेला बरा. राहुल गांधींनी पराभवानंतर आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला मात्र, तो स्वीकारला नाही. हा राजीनामा न स्वीकारणाऱ्यांना चेहरे नाहीत आणि मजबूत हात नाहीत हेच काँग्रेसचे खरे स्वरुप आहेत अशा पक्षाचे काय होणार? असा प्रश्नही सामानातून उपस्थित करण्यात आला आहे.
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

