🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी मोठ विधान केले आहे. त्यांनी ‘भारतात एकतेचं दर्शन घडतं. देशातील एकात्मतेमुळं मुस्लीम, पारसी आणि अन्य धर्माच्या लोकांना या देशात अधिक सुरक्षित वाटतं. पारसी भारतात सर्वात सुरक्षित आहेत. याशिवाय मुस्लीम नागरिकही खूश आहेत असं विधान केले आहे.
पुढे बोलताना भागवत यांनी आमच्या मनात कुणाबद्दल द्वेष नाही. एका चांगल्या समाजाच्या निर्माणासाठी आपल्याला एकत्रित पुढे जायला हवं. देशात परिवर्तन आणण्यासाठी आणि विकासासाठी हे करायला हवं, विचार आणि संस्कृती यांच्यात विविधता असूनही भारतातील नागरिक स्वतःला समान समजतात असं भागवत म्हणाले आहेत.
दरम्यान, भारतात परिवर्तनासाठी केवळ हिंदुंनाच नव्हे; तर संपूर्ण समाजाला संघटित करण्याचा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा उद्देश आहे असंही भागवत म्हणाले आहेत. तसेच समाजात परिवर्तन घडवणारे आणि देशाचा कायापालट करण्यात महत्वाची भूमिका निभावणारी चांगली माणसं आपण घडवली पाहिजेत असं भागवत म्हणाले आहेत.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1183296831603666945?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183296661545570304?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1183296441583751169?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

