Share

राज्यातील रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी रक्तदान करूया; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आवाहन

Published On: 

मुंबई : कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये रक्ताची टंचाई भासत असून राज्यातील जनतेने स्वयंस्फूर्तीने पुढे येऊन रक्तदान करावे, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. राज्यात कोरोनाची परिस्थिती पाहता अत्यावश्यक सेवासुविधांमधील सर्वच कर्मचारी काम करुन आपले कर्तव्य पार पाडत आहेत.

तसेच कोरोनाच्या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. याच पार्श्वभुमीवर राज्यात येत्या काळात रक्ताचा तुटवडा भासणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. त्यामुळे जनतेने पुढे येत रक्तदान करावे असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

कोरोना काळात राज्यातील रुग्णालयांमध्ये मोठय़ा प्रमाणावर रक्ताची टंचाई भासत आहे. अवघे पाच ते सात दिवसांचाच रक्तसाठा रुग्णालयांत असून रक्ताची कमतरता जाणवत आहे. अशा परिस्थितीत रुग्णांना जीवनदान देण्यासाठी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करा, रक्ताची टंचाई दूर करण्यासाठी पुढाकार घ्या, असे आवाहन ठाकरे यांनी आज केले.

रक्तपेढय़ा तसेच रुग्णालयांत मोठय़ा प्रमाणावर रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोनाविरुद्धच्या लढय़ात डॉक्टर, पोलीस, आरोग्य कर्मचारी आपले योगदान देत आहेत. परंतु रक्तपेढय़ांमध्ये रक्ताचा साठा कमी असल्याने रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रक्तदानाचे जनतेला आवाहन केले.

महत्वाच्या बातम्या 

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!