Share

नवे ग्राहक जोडण्यात एयरटेलने रिलायन्स जियोला टाकले मागे; एयरटेलने जोडले 37.7 लाख नवीन कनेक्शन…

Published On: 

🕒 1 min read

मुंबई: भारती एयरटेलने सप्टेंबर महिन्यात नवीन मोबाईल सब्सक्रायबर जोडण्याच्या बाबतीत रिलायन्स जियोला मागे टाकले आहे. भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणाने दिलेल्या माहितीनुसार सप्टेंबर महिन्यात एयरटेलने जियोपेक्षा अधिक ग्राहक जोडले आहेत. रिलायन्स जियो सुरु झाल्यानंतर ही कंपनी सातत्याने मार्केटवर वर्चस्व गाजवतेय. परंतु सप्टेंबर महिन्याध्ये पहिल्यांदाच जियो कंपनी नवे ग्राहक जोडण्यात मागे पडली आहे.

ट्राय च्या आकडेवारीनुसार 2020 मध्ये भारती एयरटेलने 37.7 लाख नवीन कनेक्शन जोडले आहेत. रिलायन्स जियोने 14.6 लाख तर बीएसएनएल ने 78 हजार 454 नवी ग्राहक जोडले आहेत. तर दुसऱ्या बाजूला वोडाफोन आणि आयडिया दिवसेंदिवसे खूप मागे पडत आहे. तोट्यात असलेल्या दोन्ही कंपन्या एकत्र आल्या तरी त्यांच्या व्यापारावर फार चांगला परिणाम झाल्याचे दिसत नाही. ट्रायने पुनरावलोकन केलेल्या महिन्यामध्ये वोडाफोन आणि आयडियाने 46.5 लाख ग्राहक गमावले आहेत. एमटीएनएलने 5,784 आणि रिलायंस कम्युनिकेशवन्सने 1 हजार 324 ग्राहक गमावले आहेत.

एकूण ग्राहकांच्या संख्येचा विचार केला तर रिलायन्स जियो देशात पहिल्या नंबरवर आहे. जियोचे देशभरात एकूण 40.41 कोटी ग्राहक आहेत. भारती एअरटेलचे देशभरात 32.66 कोटी ग्राहक असून ही कंपनी दुसऱ्या स्थानावर आहे. या यादीत वोडाफोन-आयडिया तिसऱ्या स्थानी आहे. त्यांच्याकडे देशभरात एकूण 29.54 कोटी ग्राहक आहेत. बीएसएनएल आणि एमटीएनएल या कंपन्या देशात अनुक्रमे चौथ्या आणि पाचव्या क्रमांकावर आहेत. त्यांच्याकडे एकूण 11.88 कोटी आणि 33.3 लाख ग्राहक आहेत.

ऑगस्ट 2020 पर्यंत देशात 116.78 कोटी फोन ग्राहक होते. त्यामध्ये थोडी वाढ झाली आहे. सप्टेंबर अखेरपर्यंत देशात 116.86 कोटी फोन ग्राहकांची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे मोबाईल कनेक्शनच्या संख्येतही थोडी वाढ झाली आहे. ऑगस्ट 2020 पर्यंत देशात 114.79 कनेक्शन्स होते. सप्टेंबरमध्ये त्यात 6 लाखांची वाढ होऊन एकूण संख्या 114.85 कोटींवर पोहोचली आहे. संपूर्ण जगाच्या तुलनेत भारतात सर्वात स्वस्त दरात मोबाईल डेटा मिळतो. परंतु या मोबाईल डेटाच्या स्पीडच्या बाबतीत भारत खूपच मागे असल्याचे काही रिपोर्ट्स समोर आले आहेत. मोबाईल डेटा स्पीड लिस्टमध्ये भारत जगात 131 व्या स्थानावर आहे. या लिस्टमध्ये श्रीलंका, नेपाळ आणि पाकिस्तान हे देश भारताच्या पुढे आहेत.

डेटा स्पीड ट्रॅक करणारी कंपनी ओकलाच्या स्पीडेस्ट ग्लोबल इंडेक्स सप्टेंबर 2020 च्या रिपोर्टनुसार भारतात सरासरी मोबाइल डाऊनलोड स्पीड हा 12.07 एमबीपीएस इतका आहे आणि अपलोड स्पीड 4.32 एमबीपीएस आहे. तर लेटेन्सी रेट 52ms इतका आहे. जगभरातील सरासरी मोबाईल डेटा स्पीड हा 35.26 एमबीपीएस इतका आहे, अपलोड स्पीड 11.22 एमबीपीएस आणि लेटेन्सी रेट 42ms इतका आहे. ग्लोबल मोबाइल डेटा स्पीड चार्टमध्ये नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका हे देश भारताच्या खूप पुढे आहेत. नेपाल या चार्टमध्ये 117 व्या, पाकिस्तान 116 व्या, श्रीलंका 102 व्या स्थानावर आहेत. नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंकेतील सरासरी डेटा स्पीड 17 एमबीपीएस पेक्षा जास्त आहे.

महत्वाच्या बातम्या

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!