🕒 1 min read
मुंबई: आयपीएल स्पर्धेची सुरुवात कधीपासून होणार याची वाट चाहते मेगा ऑक्शनपासून पाहत होते. बीसीसीआयच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत स्पर्धेची सुरुवात २६ मार्चपासून होणार असल्याचे निश्चित झाले आहे. बीसीसीआयचे चेयरमन ब्रिजेश पटेल यांनी संबंधी माहिती दिली आहे.
“आयपीएल शनिवार,२६ मार्चपासून सुरू होईल,” असे ब्रिजेश पटेल यांनी जीसी बैठकीनंतर माध्यमांना सांगितले आहे. या हंगामात लखनऊ सुपरजायंट्स आणि गुजरात टायटन्स या दोन नवीन संघांना जोडण्यात आल्याने, मुंबईच्या वानखेडे स्टेडियम आणि ब्रेबॉर्न स्टेडियमसह नवी मुंबईचे डीवाय पाटील मैदान आणि पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर ७४ सामने खेळवले जातील.
तसेच क्रिकेट रसिकांसाठीही खुश खबर मिळाली आहे. दोन वर्षानंतर प्रेक्षकांना आयपीएलचे सामने मैदानावर पाहता येणार आहे. महाराष्ट्र सरकारने ठरवून दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार प्रेक्षकांना परवानगी दिली जाईल आणि सुरुवातीस ते ४० टक्के असेल. जर कोविडची परिस्थिती नियंत्रणात राहिली आणि प्रकरणे कमी झाली, तर स्पर्धेच्या शेवटी ते स्टॅन्ड भरलेले दिसतील. २६ तारखेपासून सुरु झालेली स्पर्धा २९ मे रोजी संपणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
महत्वाच्या बातम्या
- नवाब मलिक यांच्या समर्थनात येवल्यात राष्ट्रवादीचा रस्ता रोको; भाजप विरोधात जोरदार घोषणाबाजी
- “…म्हणून या सरकारचं वर्णन भ्रष्टाचाराचा महामेरू करावं लागेल”, आशिष शेलारांचा निशाणा
- संजू सॅमसन विश्वचषक संघात खेळणार?; कर्णधार रोहितची मोठी माहिती
- ‘ईडीची चौकशी फक्त महाविकास आघाडीच्या नेत्यांचीच का ?’ अंबादास दानवेंचा सवाल
- Russia-Ukraine war : सुप्रिया सुळेंनी पोस्ट केली युक्रेनमध्ये अडकलेल्या राज्यातील विद्यार्थ्यांची लिस्ट


