🕒 1 min read
मुंबई : विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघात महाविकास आघाडीने मुसंडी मारली आहे. मराठवाडा मतदारसंघात सतिश चव्हाण विजयी झाले आहेत, नागपूर पदवीधर मतदारसंघात आघाडीचे अभिजीत वंजारी विजयी झाले आहेत. तर पुणे पदवीधर मतदार संघातून अरुण लाड यांनी बाजी मारली आहे.
राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या पुणे पदवीधर मतदारसंघात राष्ट्रवादीने भाजपला जोरदार धक्का दिला आहे. राष्ट्रवादीचे उमेदवार अरुण लाड यांनी 48 हजार 824 मतांनी भाजपचे उमेदवार संग्राम देशमुख यांचा पराभव केला आहे. या जागेवर गेली कित्येक टर्म भाजपचा गाजावाजा होता. खुद्द भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील दोनदा या मतदारसंघातून निवडून आले होते.
मात्र, यंदा शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडीचं तगडं आव्हान भाजपसमोर होतं. भाजपला रोखण्याची शक्कल या तिन्ही पक्षांनी एकत्र येत योग्य पद्धतीने राबविल्याची या निकालातून दिसत आहे. या निकालावर आता शिवसेनेचे नेते आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर पहिल्यांदाच राज्यपातळीवर आम्ही एकत्रित निवडणूक लढलो. त्यात आम्हाला घवघवीत यशही मिळाले आहे. विशेष म्हणजे भाजपच्या जागीही आम्ही विजयी झालो आहोत. या निवडणुकीचा निकाल म्हणजे सरकार चांगलं काम करत असल्याचा जनतेनेच दिलेला हा निर्वाळा आहे, असं सांगतानाच ही तर ट्रायल मॅच आहे, असं पाणीपुरवठा मंत्री आणि शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनी सांगितलं. धुळे-नंदूरबार येथे अमरीश पटेल यांचा झालेला विजय हा भाजचा विजय नाही. पटेल हे त्यांच्या कामामुळे निवडून आलेले आहेत, असंही ते म्हणाले.
महत्वाच्या बातम्या
- भाजपकडे झुकलेल्या मतदारांचा त्या पक्षाकडून भ्रमनिरास होत असल्याचे चित्र आहे : आप
- पेपरवर लिहून देतो, राज्यात ऑपरेशन लोटस होणार नाही – हसन मुश्रीफ
- ‘जुग जुग जियो’च्या शुटिंगदरम्यान अनिल कपूर, वरुण धवन, नीतू सिंह यांना कोरोनाची लागण
- ‘…पण ज्यांचा मुख्यमंत्री त्यांना भोपळा, मित्र पक्षांनीच रचला मृत्यूचा सापळा’
- ‘फडणवीस आणि चंद्रकांतदादा म्हणत असतील, काश ईव्हीएम होता तो अच्छा होता’
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

