🕒 1 min read
मुंबई : एकीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असताना दुसरीकडे कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळे कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रण मिळवण्यात आरोग्य यंत्रणांना यश आल आहे.
राज्यात कोरोना चाचणीसाठी 52 हजार जणांचे नमुने पाठविण्यात आले असून आतापर्यंत 48 हजार 198 जणांचे कोरोना चाचणीचे नमुने निगेटिव्ह आले आहेत. तर तीन हजरांच्या आसपास कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी सुमारे 60 ते 70 टक्के जणांना लक्षणे दिसत नसून 25 टक्के जणांना सौम्य स्वरूपाची लक्षणे आहेत तर पाच टक्के पेक्षाही कमी रुग्णांची स्थिती गंभीर आहे.
तसेच कल्याणमधील एका 6 महिन्याच्या चिमुकलीने कोरोनावर मात केली आहे. तर 83 वर्षांच्या आजीबाईंनी देखील या भीषण रोगावर विजय मिळवला आहे. आतापर्यंत बाधित रुग्णांपैकी सुमारे 265 रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या या रुग्णांना दवाखान्यातून घरी सोडताना ठिकठिकाणी टाळ्यांच्या गजरात निरोप दिला जात आहे.
देशातील लॉकडाउन बाबतचा मोठा निर्णय | PM Modi Announced Big Decision About India’s Lockdown
https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

