🕒 1 min read
टीम महाराष्ट्र देशा – देशात आणि राज्यात कोरोनाच्या पराश्वाभूमीवर लॉक डाऊन केलेलं आहे. याचा विपरीत परिणाम सरकारच्या कररुपी आर्थिक स्त्रोतांवर झाला आहे. महाराष्ट्र सरकारकडे कर्मचाऱ्यांचे वेतन देण्यास पुरेसा पैसा नसल्याने पगार दोन टप्प्यात करण्याचा निर्णय झाला आहे.
परंतु राज्याच्या सेवेसाठी आपलं कर्तव्य अहोरात्र बजावत असलेल्या पोलीस कर्मचर्यांना वेतनाचा दुसरा टप्पा मिळाला नाही. तसेच त्यांना शिधापत्रिकेवरील धान्य मिळत नाही त्यामुळे ते अडचणीत आले आहेत. त्यामुळे त्यांना शिधावाटप करा अशी मागणी भाजपनेते निलेश राणे यांनी ट्वीटरवरून केली आहे. ते म्हणाले,
‘राज्य सरकारने मुंबई पोलिसांचा पगार २ टप्प्यात करण्याचा निर्णय घेतला. १टप्पा आला पण २रा टप्पा काही पोलीसांना मिळाला नाही. पोलीसांकडे श्वेत(सफेद)शिधा पत्रिका आहेत त्यामुळे त्यांना रेशनवर कोणतीही शिधा मिळत नाही म्हणजे एकीकडे पगार नाही/दुसरीकडे अन्न नाही. पोलिसांना शिधावाटप सुरु करा.’
राज्य सरकारने मुंबई पोलिसांचा पगार २ टप्प्यात करण्याचा निर्णय घेतला. १टप्पा आला पण २रा टप्पा काही पोलीसांना मिळाला नाही. पोलीसांकडे श्वेत(सफेद)शिधा पत्रिका आहेत त्यामुळे त्यांना रेशनवर कोणतीही शिधा मिळत नाही म्हणजे एकीकडे पगार नाही/दुसरीकडे अन्न नाही. पोलिसांना शिधावाटप सुरु करा.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) April 15, 2020
हेही पहा –
https://www.youtube.com/watch?v=JS-Bb4hxUBI
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

