Share

Devendra Fadanvis | “११७ जागा लढणारा भाजपा, २८८ जागा लढण्यास तयार होण्याचं कारण म्हणजे…”

Published On: 

🕒 1 min read

Devendra Fadanvis | मुंबई : मुंबईत केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपा नेते अमित शाह यांच्यावर आधारित एका पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला. या कार्यक्रमात बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला आहे. शिवसेनेने २०१४ मध्ये फक्त चार जागांसाठी युती तोडली आणि बेईमानी केली असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) म्हणाले, “शिवसेनेने बेईमानी केली, पण अमित शाह (Amit Shah) यांच्या रणनीतीच्या जोरावर आपण निवडणूक जिंकली.” पुढे ते म्हणतात, “महाराष्ट्राच्या २०१४ च्या निवडणुकीत आपण शिवसेनेसह युती करण्यास तयार होतो. आपण कमी जागा लढण्यासही तयार होतो. पण केवळ चार जागांसाठी शिवसेनेने युती तोडली.

“अचानक युती तुटल्यानंतर वर्षानुवर्ष ११७ जागा लढणारा भाजपा, एका दिवसात २८८ जागा लढण्यास तयार झाला. याचं एकमेव कारण म्हणजे अमित शाह आपल्या पाठीशी उभे होते,” असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं. शिवाय निवडणुकीतील अनेक गोष्टी, तंत्र त्यांनी आपल्याला शिकवल्या. त्यातून पहिल्यांदाच महाराष्ट्रात भाजपाचं स्वत:चं सरकार आपण पाहिलं. यामध्ये अमित शाह यांचा सिंहाचा वाटा आहे,” असं कौतुक फडणवीसांनी केलं.

यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांनी अमित शहांवर स्तुतीसुमने उधळली. अमित शाह यांच्या नेतृत्वात आपण उत्तम प्रकारे निवडणूक लढलो. दोन-अडीच महिने ते महाराष्ट्रात राहिले. याच कार्यालयात ते मुक्काम करायचे, दिवस घालवायचे. निवडणुकीत सगळ्या प्रकारची मदत त्यांनी केली असल्याचं त्यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या :

बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा

Subscribe Now

Join WhatsApp

Join Now
Author Profile

🕘 संबंधित बातम्या

Maharashtra Desha

महाराष्ट्र देशा App डाउनलोड करा

ताज्या बातम्या सर्वात आधी — Notifications सकट!

★★★★★ 4.8 (12K+ reviews)
🔔 Breaking Alerts 📖 Offline वाचा 🎙️ Audio News 📺 Live TV

FREE पूर्णपणे मोफत — कोणतेही Subscription नाही
📲
     App वर बातम्या जास्त मजेत वाचा! Notification मिळवा • Offline वाचा
🚀 आत्ताच Download करा — Free!