मुंबई : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देशासह राज्यात अक्षरशः थैमान घातले आहे. शहरी भागासह ग्रामीण भागात कोरोनाचा कहर सुरूच आहे. अनेक रुगांना आपला जीव गमवावा लागला आहे. आता राज्य सरकारने विविध उपाययोजना राबवण्यास सुरुवात केली असून तज्ज्ञांनी वर्तवलेल्या तिसऱ्या लाटेचा धोका वेळीच ओळखून परिथिती आटोक्यात ठेवण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली 18 जिल्ह्याचे जिल्हाधिकारी, पोलीस अधिकारी आणि आरोग्य अधिकाऱ्यांची बैठक झाली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी होम आयसोलेशनबाबत मोठा निर्णय जाहीर केला आहे. अनेक ठिकाणी होम आयसोलेशन म्हणजेच घरीच विलगीकरणात असलेले कोरोना रुग्ण हे बिनधास्त बाहेर फिरत असल्याचं आढळून आलं आहे. यामुळे इतर नागरिकांच्या आरोग्यास धोका असल्याने आता होम आयसोलेशनवर बंदी घालण्यात आली आहे.
सध्याच्या स्थितीला राज्यातील ज्या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी रेट एकूण राज्याच्या पॉझिटिव्हिटी रेटपेक्षा जास्त आहे, त्यांना दोन महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या. त्यातील पहिली म्हणजे, होम आयसोलेशन १०० टक्के बंद करुन कोविड सेंटर वाढवा आणि तिथे रुग्णांना आयसोलेट करा. त्यासाठी अतिरिक्त कोविड सेंटर उभारले जाणार आहेत. तसेच राज्यातील सर्व रुग्णालयांचं फायर ऑडिट करण्यास प्राधान्य देणार असल्याचंही आरोग्यमंत्र्यांनी सांगितलं आहे.
त्यामुळे आता कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास घरी विलगीकरण न करता = कोविड सेंटर/रुग्णालयांमध्ये आयसोलेट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान, पुणे, नागपूर, रायगड, बुलढाणा, कोल्हापूर, रत्नागिरी, सांगली, यवतमाळ, अमरावती, सिंधुदुर्ग, सोलापूर, अकोला, सातारा, वाशिम, बीड, गडचिरोली, अहमदनगर आणि उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये होम आयसोलेशन बंद केलं जाणार आहे.
महत्वाच्या बातम्या
- मोठी बातमी : दहावीच्या परीक्षांसह अकरावी प्रवेशाबाबत राज्य सरकार जीआर काढण्याची शक्यता !
- ‘मृत्यू प्रमाणपत्रावर ‘कोरोना’ का लिहीत नाही?’, सुप्रीम कोर्टाचा केंद्राला सवाल
- ‘ “रेनिसान्स स्टेट” या पुस्तकावर देशभरात कायमची बंदी घाला आणि विक्री झालेली पुस्तकं…’
- महिला खेळाडू आणि बीसीसीआयच्या वादात इंग्लंडची माजी क्रिकेटपटू इशा गुहाची उडी
- मराष्ट्राच्या दैवताचा अपमान करणाऱ्या गिरीश कुबेरांनी माफी मागावी : पटोले आक्रमक


