🕒 1 min read
तुळजापूरः जे पक्षाशी इमानदार राहू शकले नाहीत, ते तुमच्याशी काय इमानदार राहणार, असा सवाल कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी तामलवाडी (ता. तुळजापूर) येथील प्रचारसभेत केला.
तुळजापूर मतदारसंघातील कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीचे उमेदवार आमदार मधुकरराव चव्हाण यांच्या प्रचारासाठी शहरात सभा झाली. यावेळी थोरात बोलत होते. माजी खासदार हुसेन दलवाई, कॉंग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत, माजी आमदार नरेंद्र बोरगावकर, माजी आमदार सिद्रामप्पा आलुरे गुरुजी, कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील उपस्थित होते.
थोरात म्हणाले, की साडेनऊ वर्षे उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यांचा मी पालकमंत्री होतो. आमदार चव्हाण यांच्या रूपाने कर्तृत्ववान लोकप्रतिनिधी तुम्हाला मिळाला आहे. दुष्काळी परिस्थितीत मजुरांना काम देण्यासाठी आमदार चव्हाण यांनी काम केले. विरोधी उमेदवार हे दुसऱ्या पक्षात गेलेले आहेत. जे पक्षाशी इमानदार राहू शकले नाहीत, ते तुमच्याशी इमानदारी काय करणार, अशी टीका त्यांनी केली.
महत्वाच्या बातम्या
https://twitter.com/Maha_Desha/status/1182597883188539392?s=20
https://twitter.com/Maha_Desha/status/1182598829171859457?s=20
बातम्यांसाठी YouTube चॅनेल Subscribe करा
Subscribe Now

